सोमवार, १९ जुलै, २०१०

तुझ्या आयुष्यात काळानुसार निसर्गक्रमानुसार किंवा निसर्गक्रमाविरुद्ध होत असणारे बदल,तुझ्या शरीरातील,मनातील आणि बुद्धीतील,जर तुला आनंददाई हवे असतील तर माझ्या लाडक्या तुला प्रवेश करावा लागेल त्या सदगुरू धामामध्ये.गुरुआज्ञा हीच सदगुरूंची शक्ती आणि गुरु आज्ञापालन,निःशंक आणि अहंकार रहित गुरुसेवाव्रतहीच आहे गुरुकिल्ली तुझ्या आणि काळाच्या प्रेम संबधामध्ये असणारे बंद दरवाजे उघडण्याची आणि त्रिकालाच्या काल्कोठ्डीतून तुझी सुटका करण्याची.