गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

तयाचे आम्हा व्यसन | ते आमुचे निधिनिधान ||
किंबहुना समाधान | ते मिळती तै ||
(ज्ञानेश्वरी १८ /१७९४)
सुदामा हा श्रीकृष्णाचा बालमित्र. कृष्ण सोन्याच्या महालात राहत होता तर सुदाम्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती.पत्नीच्या आग्रहावरून सुदामा कृष्णाकडे गेला.कृष्णाच्या महालात तो आठ दिवस राहिला.एक दिवस महालातील वेगवेगळी दालने पाहत असताना सुदाम्याने एका दालनाजवळ "देवघर" अशी पाटी पहिली.सुदाम्याला ती पाटी पाहून आश्चर्य वाटले. कृष्ण स्वतः परमात्मा आहे.त्याच्या देवघरात कोणता देव असेल?मोठ्या कुतुहलाने सुदामा त्या दालनात शिरला आणि काय आश्चर्य!
त्या दालनात राधेची मूर्ती होती,अर्जुनाची मूर्ती होती,उद्धव होता आणि चक्क सुदामादेखील होता. आपली स्वतःची मूर्ती भगवंताच्या देवघरात पाहून सुदाम्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या.भक्त हेच भगवंताचे ऐश्वर्य असते.तो नियम देव आणि भक्त यांना लागू आहे.
भगवान रामकृष्ण परमहंस यांना नरेंद्रनाथाला (विवेकानंद)पाहण्याचे असेच व्यसन लागले होते. दोन-चार दिवस नरेंद्रनाथ जर आला नाही तर रामकृष्ण बेचैन व्हायचे. या जगात कोणतेच प्रेम एकतर्फी नसते. जे एकतर्फी असते ते प्रेम नसते. ती वासना असते. पुंडलीकामुळे विठ्ठलाचे महात्म्य वाढले तर विठ्ठलामुळे पुंडलिक अजरामर ठरला.तेव्हा भगवंताचेही आपल्यावर प्रेम आहे हे भक्ताने ध्यानात ठेवावे.

सोमवार, ४ जुलै, २०११


बंका महार,चोखामेळा,त्याची बायको सोयराबाई,त्याची मेव्हणी निर्मळाबाई हे सर्व महार जातीतील संत यांना कोणत्याही प्रकारच शिक्षण मिळाले नाही.परिस्थिती अत्यंत गरिबीची,खायला अन्न पाणी नाही या अवस्थेतही त्यांना किती श्रेष्ट ज्ञान प्राप्त झाले.या सगळ्यांनी संसार केला.गरिबी असूनही ते परमेश्वराला विसरले नाहीत म्हणूनच ते परमेश्वराचे प्रिय झाले.या चोखामेळ्याचा मृत्यू कसा झाला याची ही कथा......
एकदा चोखामेळा गावकुसाची भिंत बांधत होता.त्यावेळी ती भिंत त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने अत्यवस्थ झालेला बंका महार ढिगाऱ्यामध्ये त्याचे अवशेष शोधतो पण त्याला ते सापडत नाहीत.शेवटी बंका महाराला निर्मळाबाई म्हणते,'ज्या ठिकाणी त्याचे अवशेष शोधताना विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या ठिकाणी चोखामेळ्याची अस्थी असतील त्या ठिकाणी त्याचे रक्त सांडलेले असेल.'बंका महार ढिगारा उचलायला सुरुवात करतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ढिगारा उचलत असताना त्याला विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकू येतो.ज्या ठिकाणी जो भाग सापडतो त्या भागाला रक्त लागलेले नव्हते कि कसली घाण येत नव्हती किंवा किडेही पडलेले नव्हते.त्याच्या शरीराचे पाच भाग झाले होते.हे पाचही भाग बंका महार एकत्र करून घेतो.त्याला अग्नी देतो.त्याच्या देहाची जी राख होते त्या राखेतुनही विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकू येत होता.
बंका ती राख घेऊन पंढरपूरला जातो.त्याच्याबरोबर नामदेवांपासून सगळे संत आहेत.त्या रक्षेची स्थापना पंढरपूरला केली जाते.ज्या मडक्यामध्ये ही रक्षा ठेवलेली होती त्या मडक्याला एक कपडा बांधलेला होता.चोखामेळा हा बंकाचा गुरु होता.आपला गुरु गेल्यामुळे बंकाला भरभरून येते.त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात.तो अन्न-पाणी सोडून देतो.चोखामेळ्याच्या समाधीपाशी बसून राहतो.नामदेव महाराज,निळोबा सगळे त्याची समजूत काढतात,'अरे बंक्या उठ.परमेश्वराने आयुष्य दिल आहे ना तर तो बघून घेईल.''अरे,तू सुद्धा चोख्यासारखी भक्ती करत राहिलास तर तुलाही परमेश्वर दिसेल.''माझ्या गुरूला विठोबा दिसला ना भरपूर झाल,मला विठोबा बघायचा नाही,मला फक्त माझा गुरु दिसला पाहिजे.विठोबा दिसला नाही तरी चालेल.आता मला उपास नको,तापास नको,विठ्ठलाचे नाव नको.'
अशा प्रकारे बंका ५१ दिवस चोखामेळ्याच्या समाधीपाशी अन्न-पाणी न घेता बसून राहतो.त्याच्या बाजूला चोख्याची पत्नी आणि निर्मळाबाई बसलेली होती.बाकीचे लोक त्याची येवून जाऊन सेवा करत राहतात.५१ व्या दिवशी जगतमाता रुक्मिणी तिकडे जाते आणि बंकाला म्हणते,'बंका ,किती दमला रे,थोड पाणी पी रे.तुझ आयुष्य ठरलेलं आहे.तुला ते भोगायलाच पाहिजे.तो जरी आधी गेला तरी त्याच गुरुतत्व तर कायम व्यापून आहे.' ''आई,या गोष्टी मला कळत नाहीत आणि कळल्या तरी मला त्या नकोत.मला फक्त एकदाच गुरूने दर्शन द्यावे व सांगावे मी तुझा आहे.माझी आणि त्यांची शेवटची भेटसुद्धा झाली नाही.शेवटच्या क्षणी मी असतो तर सगळे दगड मी माझ्या डोक्यावर घेतले असते.मग त्याला नेण्याची तुमच्या दोघांची काय बिशाद असती!मी आडवा पडलो असतो.आई,तू हे चांगल नाही केलस."
रखुमाई हसते.ती लगोलग विठ्ठलाला जाऊन म्हणते,अहो काय हे अजून कसे तुम्ही स्थितप्रज्ञ,अजून कसे हात कडेवरतीच?उठा माझ लेकरू कस तळमळत आहे बघा.त्याच्या बोलण्याने माझ मन विव्हळत आहे.उठा देवा उठा."विठ्ठल म्हणतो,'अग मी जाऊन काय करू? तो बंका तर स्पष्ट म्हणतो मला विठ्ठल आला तरी नको!" रखुमाई म्हणते ,'तुम्ही चोख्याचे देव आहात न.तुम्ही चोख्याला सांगा.तुम्ही सांगितल्या शिवाय आपल्या शिष्याचा आकांत बघूनही चोखामेळा बाहेर येणार नाही." विठ्ठल कृपेने प्रगटून चोख्याजवळ जातो आणि त्याला आपल्याबरोबर बंकाजवळ घेवून जातो.
बंका महार समोर जेव्हा चार पावल येतात तेव्हा बंका महार फक्त चोख्याची पावल बघतो.संपूर्ण चोख्यालाही बघत नाही.चोख्याची पावल दिसताच बंका चोख्यात विलीन होऊन जातो. संपूर्ण शरीर बघायची त्याला जरूर भासत नाही.हि बंकाची ताकद आहे.आता योगमायेला,रुक्मीणीला प्रश्न पडतो बंका महाराच आयुष्य तर शिल्लक आहे आणि गुरुभक्तीने बंका चोख्यात एकरूप होऊन गेला.आता करायचं काय?आता मार्ग एकच...चोखामेळ्याचे तत्त्व बंकाबरोबर जिवंत करून बंका बरोबर कायमच ठेवण याशिवाय या योगमायेला मार्ग उरत नाही.त्याक्षणी चोख्याचा देहपात होऊनसुद्धा चोख्याच्या आत्मरूपाने जीवात्मारूपाने तो बंका बरोबर बंकाच्या जीवाला देहात्मा सोडेपर्यंत राहण्याची आज्ञा त्या रुक्मिणीला द्यावी लागते.
अशा या चोख्याची समाधी पंढरपूरला आहे.पंढरपूरला गेलो तर तीन गोष्टी विसरायच्या नाहीत एक नामदेवाची पायरी,दुसरी जनाबाईचा देव्हारा आणि तिसरी चोखामेळ्याची समाधी.अगदी प्रेमाने त्यांची भेट घ्यायची.

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

सदाबहार किशोर कुमार


हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक.
किशोर कुमार
पूर्ण नाव - किशोर कुमार गांगुली
जन्म - ४ ऑगस्ट इ.स. १९२९
खंडवा मध्य प्रदेश
मृत्यू - १३ ऑक्टोबर इ.स. १९८७
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र - गायक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४६ – १९८७
प्रमुख चित्रपट चलतीका नाम गाडी, पडोसन, दिल्लीका ठग, नई दिल्ली, झुमरू, आशा, हाफ़ टिकट, श्रीमान फ़न्टूश

अपत्ये
- अमित कुमार, सुमीत कुमार

बालपण
किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंडे अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार.

किशोर कुमार यांची सदाबहार गीते :-
http://globalmarathi.com/Tiny.aspx?RT692Tu

बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बोंम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ. स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ. स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएं क्यों मांगू". यानंतर किशोर कुमार यांना बरेच गाण्याच्या संधी मिळाल्या. इ. स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले. बॉंम्बे टॉकीजच्या व फनी मजूमदार दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.

किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.

अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्‍याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" (इ. स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोर चे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमार च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.

शेवटची वर्षे
किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरवातीला केले, उदा. बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परन्तु बॉक्स ऑफिस वर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.

आर. डी. बर्मन व राजेश रोशन च्या पाठींब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी अनिल कपूर च्या पहिल्या चित्रपटासाठी (वोह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर. इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी रीटायर होउन खंडवाला जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अतंविधी साठी खंड़व्याला नेण्यात आला.

वैयक्तिक जीवन
किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ़ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत विवाहित होते. किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रख्यात अभिनेत्री मधुबाला. मधुबालाने किशोर कुमारांबरोबर "चलती का नाम गाड़ी" (१९५८) सारख्या बर्‍याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुसलमान होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव "करीम अब्दुल" असे ठेवले होते. नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. हे लग्न ९ वर्ष टिकले. मधुबाला चा मृत्यु फेब्रुवारी २३ १९६९ झाला. किशोर कुमार ची तीसरे लग्न योगीता बाली झाले व ते १९७६ ते ऑगस्ट ४ १९७८ होते. नंतर किशोर कुमार यांनी १९८० साली लीना चंदावरकर झाले. किशोर यांना दोन अपत्य, अमित कुमार (रुमा पासून) व सुमित कुमार (लीना पासून) आहेत.
चित्रपट

किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट:
* पडोसन(१९६८)
* दूर गगन की छाँव में (१९६४)
* गंगा की लहरें (१९६४)
* मिस्टर एक्स इन बॉंम्बे (१९६४)
* हाफ टिकट (१९६२)
* मनमौजी (१९६२)
* झुमरू (१९६१)
* चलती का नाम गाड़ी (१९५८)
* दिल्ली का ठग (१९५८)
* आशा (१९५७)
* न्यू दिल्ली (१९५६)
* बाप रे बाप (१९५५)
* मिस माला (१९५४)
* नौकरी (१९५४)

किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहे. त्यांचे गायक म्हणून गाजलेले काही चित्रपट:
* मिस्टर इंडिया (१९८७)
* सागर (१९८५)
* शराबी (१९८४)
* अगर तुम ना होते (१९८३)
* सत्ते पे सत्ता (१९८२)
* नमक हलाल (१९८२)
* लावारिस (१९८१)
* रौकी (१९८१)
* याराना (१९८१)
* कर्ज़ (१९८०)
* मुकद्दर का सिकंदर (१९७८)
* डॉन (१९७८)
* अनुरोध (१९७७)
* शोले (१९७५)
* खुशबू (१९७५)
* जुली (१९७५)
* आंधी (१९७५)
* मीली (१९७५)
* पोंगा पंडित (१९७५)
* रोटी (१९७४)
* कोरा कागज़ (१९७४)
* अभिमान (१९७३)
* यादों की बारात (१९७३)
* परिचय (१९७२)
* रामपुर का लक्ष्मण (१९७२)
* बोँम्बे टू गोवा (१९७२)
* मेरे जीवन साथी (१९७२)
* हरे राम हरे कृष्ण (१९७१)
* अमर प्रेम (१९७१)
* अंदाज़ (१९७१)
* बुढा मिल गया (१९७१)
* शर्मीली (१९७१)
* प्रेम पुजारी (१९७०)
* कटी पतंग (१९७०)
* प्यार का मौसम (१९६९)
* पडोसन (१९६८)
* ज्वैल थीफ (१९६७)
* गाइड (१९६५)
* तीन देवीयाँ (१९६५)
* दूर गगन की छाँव में (१९६४)
* मिस्टर अँक्स इन बोँम्बे (१९६४)
* हाफ टिकट (१९६२)
* मनमौजी (१९६२)
* झुमरू (१९६१)
* दिल्ली का ठग (१९५८)
* नौ दो ग्यारह (१९५७)
* पेइंग गेस्ट (१९५७)
* फंटूश (१९५६)
* हाऊस नम्बर ४४ (१९५५)
* मुनिमजी (१९५४)
* टैक्सी ड्राईवर (१९५४)
* जाल (१९५२)
* बाजी (१९५१)
* बहार (१९५१)
किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

शरद तळवलकर आता आठवण उरलीय





शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलीटरी अकौंटस्’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.

विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला.

पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ आणि ‘सखी शेजारीण’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.

अतिशय बोलक्या चेह-याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.

नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘अखेर जमलं’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘बायको माहेरी जाते’, ‘मुंबईचा जावई’ आणि ‘एकटी’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. ‘जावई विकत घेणे’ मधील म्हाता-याच्या भूमिकेचे आणि ‘एकटी’तील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.



सोमवार, १९ जुलै, २०१०

तुझ्या आयुष्यात काळानुसार निसर्गक्रमानुसार किंवा निसर्गक्रमाविरुद्ध होत असणारे बदल,तुझ्या शरीरातील,मनातील आणि बुद्धीतील,जर तुला आनंददाई हवे असतील तर माझ्या लाडक्या तुला प्रवेश करावा लागेल त्या सदगुरू धामामध्ये.गुरुआज्ञा हीच सदगुरूंची शक्ती आणि गुरु आज्ञापालन,निःशंक आणि अहंकार रहित गुरुसेवाव्रतहीच आहे गुरुकिल्ली तुझ्या आणि काळाच्या प्रेम संबधामध्ये असणारे बंद दरवाजे उघडण्याची आणि त्रिकालाच्या काल्कोठ्डीतून तुझी सुटका करण्याची.